Friday, November 20, 2009

आनंदामधे वाहून जायला बालमन लागते ...

आनंदामधे वाहून जायला बालमन लागते ...
अनेक क्षण येतात आणि जातात ..
त्यातल्या काही क्षणांमधेच एव्हडी ताकद असते की ते आपल्याला उपभोग घ्यायला भाग पाडू शकतात ..
पण आपण मेले कर्म दरिद्री ... कुठली ना कुठली पळवाट काढतोच .....

Thursday, November 19, 2009

जे वाहून जाताय ते जाउ दे ..

जे वाहून जाताय ते जाउ दे ..
माणसाने नेहमीच नदीच्या भूमिकेत असले पाहिजे असे नाही ...
कधी कधी पाळमूळ घट्ट  रोवलेले झाड सुध्डा होऊन बघाव ..
म्हणजे आपल्यालाच कळत आपले विचार किती खोलवर रूजलेत  ते

Friday, April 3, 2009

एका वधुची परीक्षा ...........

नमस्कार मित्रांनो ...

पहिली मुलाखत .. तीही मूलखती देणारीची ...
नाव न सांगण्याची अटीवर तिने जे सांगितले ते तुमच्यासाठी इथे देत आहे ...
 

Wednesday, April 1, 2009

काम

सगळी काम पूर्ण करणे म्हणजे हे माहीत असणे .. की कुठली काम करायची नाहीत ...

Monday, March 30, 2009

दंगल

सर्वात जास्त तीव्रतेने आवडणारी गोष्ट एकट्या माणसाकडूनही दंगल घडवण्याची क्षमता ठेवते ...

समजूतदार व्यक्ती

समजूतदार व्यक्ती स्वत:ला बदलवू शकते आणि बदलते .. जसे जग आहे त्याप्रमाणे ... आणि इतर व्यक्ती प्रयत्न करत राहतात .. जगाने बद्लावे ह्यासाठी ... खरी प्रगती त्यांच्याकडुनच होते ...  जे जग बदलण्यासाठी प्रयत्न करत रहातात ...

Sunday, March 29, 2009

लोकशाही म्हणजे एक प्रक्रिया

लोकशाही म्हणजे एक प्रक्रिया .. ज्यामधे ... आपण तत्पर असतो अशी व्यक्ती निवडण्यासाठी .. जिच्यावर ... सगळ्या चुकांची जबाबदारी टाकता येईल...

Thursday, March 12, 2009

शिवाजी महाराज - आज त्यांची जयंती ..

बाबा आपल्या 5 वर्षाच्या निरागस मुलाला  सांगत होते ..
शिवाजी महाराज किती शूर आणि पराक्रमी होते आज त्यांची जयंती ..
त्यांच्याकडे  खूप अश्या गोष्टी आहेत ज्यातुन आपल्याला खूप काही शिकता येईल ...
 
आणि छोटु म्हणाला  .. बाबा बाबा ss .. काल रात्री किनई शिवाजी महाराज माझ्या स्वप्नात आले होते ..
नि काय म्हणाले माहितेय ... मलाही तुझ्यासारखे होता येईल का रे ?
ssssss नि छोटु आनंदाने उड्या मारत खेळायला  पळाला ...

व्यर्थ

कुणा दुसर्‍या सारखे  व्हावे वाटणे म्हणजे तुम्ही जे आहात ते व्यर्थ असणे होय ...

Tuesday, March 10, 2009

होळी

दुसर्‍याच्या रंगामधे रंगून जाणे .. हे तसे फार अवघड नसते ... गरज असते ती फक्त .. समर्पणाची   ...

शिमग्याच्या हार्दिक शुभेछ्या

रंगांशी मैत्री म्हणजे निसर्गाला आवाहन ... प्रत्येक सजीवाला ... तुझ्या सारखी नितळ हिरवळ लाभावी असे ..

Thursday, March 5, 2009

अस्वीकार

खळखळणारी  नदी स्वच्छ असायचे कारणच  हे असते ,
की  ती तिच्या मधल्या पाण्याचे परिवर्तन स्वीकारते ...
नवीन पाण्याचा अस्वीकार ज्यावेळी ती करू लागेल ..
त्यावेळी तिचे डबक्यात  रुपांतर होण्यासा उशीर लागणार नाही

Saturday, February 28, 2009

परीस स्पर्श

एका लहान मुलाने आजोबांना रस्ता ओलांडायला मदत केली ..
नि आजोबा म्हणाले ... आज मला परीस स्पर्श झाला ... 

Tuesday, February 24, 2009

उत्तरे

कधी कधी सगळी उत्तरे माहीत असण्यापेक्षा काही प्रश्न माहीत असणे जास्त चांगले

Monday, February 2, 2009

प्रभाव

मी माझ्या विचारांकडे बघितले त्यावेळी कळले...
तेच तर माझ्या शब्दांवर प्रभाव टाकत होते ...
माझे शब्द ... माझ्याकडून कृती घडवून आणत होते ...
आणि कदाचित त्यामधूनच माझ्या सवयींचा जन्म झाला ....
आणि बघता बघता माझे व्यक्तिमत्व तयार झाले .... 

Wednesday, January 21, 2009

एका ट्रेन ची गोष्ट

एक गोष्ट सांगतोय ...

नीट लक्ष देऊन ऐका आणि निर्णय घ्या ...
तुमची निर्णयक्षमता तपासण्यासाठी ही गोष्ट नक्की उपयोगी पडेल ...

एकदा काही मुले रेलवे ट्रॅक वर खेळत होती .. तिथे 2 ट्रॅक होते ... एक
असा जो .. जो वापरात नाहीए .. नि दुसरा असा .. जो सध्या वापरला जातो
आहे...

त्यात फक्त एकच लहान मुलगा वापरात नसलेल्या ट्रॅक वर खेळत होता .. बाकीचे
सगळे चालू ट्रॅक वर खेळत होते ....

नेमकी त्यावेळी ट्रेन आली ... आणि तुमची ड्यूटी ट्रॅक बदलण्याच्या जागी आहे ...
अशावेळी तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे ...
तुम्ही ट्रॅक बदलू शकता ... आणि सगळ्या मुलांना वाचवू शकता ... एका लहान
मुलाचा बळी देऊन ...

किंवा ... ट्रेन ला आपल्या मार्गाने जाऊ देऊ शकता ... ...

>>
क्षणभर विचार करूया ...


>>
निर्णय तर घ्यायचा आहे ...


>>
आता पुढे वाचा ...


>>
बहुदा .. बरेच जण त्या लहान मुलाला सॅक्रिफाइस करायचा निर्णय घेतील ...
नैतीकतेने आणि भावनाशिलपणे

पण तुम्ही जर नीट विचार केला .. तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील ...

1 . ज्या मुलाचा तुम्ही बळी देत आहात .. त्याने खूप योग्य निर्णय घेतला
होता ... सुरक्षित जागी खेळण्याचा ...
2. आणि त्याचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे त्याच्या अशा
मित्रांमुळे ज्यांनी माहीत असूनही ... धोक्याच्या ठिकाणी खेळणे निवडले
...
3. अशा प्रकारची दुविधा स्थिती आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते ऑफीस मधे ...
समाजामधे .. राजकारणामधे ... मुख्यत्वे लोकशाही प्रक्रियेमधे ... जिथे
योग्य माणसाचा बळी दिला जातो .. कारण अयोग्य माणसांचे संख्याबळ जास्त
असते ...
4. एक तर त्याचा बळी दिल्या जाईल आणि एकही अश्रूचा थेंब कुणाच्याही
डोळ्यातून बाहेर येणार नाही त्याच्यासाठी

****************************************************************************************
योग्य निर्णय हाच आहे ... की ट्रॅक बदलू नये ....

>>कारण .. त्या ट्रॅकवर खेळणारी मुळे कदाचित सावध असतील .. आणि ते पळू शकतील...

>>पण ह्या वापरात नसलेल्या ट्रॅक वर ट्रेन येईल असा विचारसुध्डा त्या लहान मुलाच्या मनाला शिवनार नाही ... आणि मग जे होईल ते अटळ असेल ...

>>आणि तो ट्रॅक वापरात नसायचे कारण देखील हे असु शकेल की .. तो मुळातच धोकादायक आहे .... आणि अशा धोकादायक ट्रॅक वर ट्रेन चालवुन आपण हजारो प्रवाश्यांचा जीवही विनाकारण धोक्यात टाकत आहोत ...

एक गोष्ट लक्षात ठेवावी ...

जे बरोबर आहे कदाचित ते लोकप्रिय नसेल...
पण जे लोकप्रिय आहे ते नेहमीच बरोबर आहे असे नसते ...

शिरीष जांभोरकर

एका ट्रेनची गोष्ट

Tuesday, January 20, 2009

चुकीची गोष्ट

अशी कुठलीही चुकीची गोष्ट नसते ... जी बरोबर गोष्टीने दुरुस्त केली जाऊ
शकत नाही ...
एवढ्या लोकांनी वाचलाय माझा ब्लॉग!
http://www.free-website-hit-counters.com
Download a free web counter here.
IndiBlogger - Where Indian Blogs Meet
 
Who links to my website?